संयम |Restraint – गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाची प्रेरणादायी कथा

संयम |Restraint – गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाची प्रेरणादायी कथा

एकदा गौतम बुद्ध बुद्ध धर्माचा प्रसार करत होते. खूप वेळ प्रवास करत असल्यामुळे यांना भरपूर तहान लागली होती म्हणून त्यांनी शेजारीच असणार्‍या एका झाडाखाली विश्रांती घेण्‍याचा निर्णय घेतला. त्यांच्याजवळ असणारे पाणी संपले होते म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या शिष्य पैकी एका शिष्याला शेजारीच गावातून पाणी आणावयास पाठवले. Samyam (Restraint) – Inspirational story of Gautama Buddha’s philosophy

तो शिष्य हातामध्ये मडके घेऊन पाणी आणण्यास गेला. तो जेव्हा त्या नदीपाशी पोहोचला तेव्हा त्यांनी पाहिले की त्या नदीमध्ये लोक आंघोळ करीत आहेत, वस्त्र, गाई, म्हशी धूत आहेत त्यामुळे पाणी खूप गढूळ झाले आहे. हे गढूळ पाणी आपल्या गुरुंसाठी म्हणजे गौतम बुद्धांसाठी घेऊन जाणे हे बरोबर नाही म्हणून तो शिष्य हातामध्ये असलेली मडके रिकामी घेऊनच परत गौतम बुद्धांच्या ठिकाणी पोहोचला. Samyam (Restraint) – Inspirational story of Gautama Buddha’s philosophy

गौतम बुद्धांनी विचारले आणले का पाणी. त्यावर या शिष्याने पाहिलेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांनी अजून एका शिष्याला पाणी आणावयास पाठवले. भरपूर वेळ निघून गेला तरी पण तो शिष्य आला नाही. परंतु थोड्या वेळातच शिष्य गौतम बुद्धांच्या पाशी आला. Samyam (Restraint) – Inspirational story of Gautama Buddha’s philosophy

त्यांनी आणलेले पाणी गौतम बुद्धांना दिले. त्यावर अचंबित होऊन गौतम बुद्धांनी विचारले या नदीतील पाणी तर खराब होते पण तुम्ही पाणी आणले कुठून? Samyam (Restraint) – Inspirational story of Gautama Buddha’s philosophy

त्यावर तो शिष्य म्हणाला हो खरच ते पाणी खूपच खराब होते मी तेथील सर्व लोक, गाई-म्हशी या जाण्याची वाट पाहिली. थोड्याच वेळात ते सर्व लोक तेथून निघून गेली ज्यामुळे तो पाण्यात तरंगत असलेला गाळ हा हळूहळू खाली बसला आणि खराब पाणी वाहून जाऊ लागले त्यानंतर मला स्वच्छ व निर्मळ पाणी भेटले ते पाणी मी घेऊन आलो आहे.

हे एकूण गौतम बुद्धांनी त्यांच्या सर्व शिष्यांना एक संदेश दिला की आपले जीवन हे देखील त्या नदी सारखेच आहे. जीवनात चांगले काम करत राहिल्यामुळेच मन हे नेहमीच शुद्ध होत राहत असत. परंतु जीवनात असे भरपूर क्षण येतात त्यामध्ये आपल्याला दुःख आणि समस्यांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीमध्ये हे जीवनावश्यक पाणी सुद्धा आपल्याला दूषित वाट लागते. Samyam (Restraint) – Inspirational story of Gautama Buddha’s philosophy

तात्पर्य: ह्या गोष्टीवरून आपल्याला हे शिकण्यास मिळते की आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख संकटे आली तरी आपण त्यांना घाबरले नाही पाहिजे व त्यांचा आत्मविश्वासाने सामना केला पाहिजे. संकटे तर काही काल राहतात जात राहतात परंतु आपण आपला संयम आणि आपली चांगली कामे करतच राहिला पाहिजे त्यामुळेच तर आपल्या नदीचे पाणी हे शुद्ध होत असते. जर आपण अशा संकटांमुळे थांबलो तर याच पाण्याचे दूषित डबके होईल आणि पुढे जे आपल्यालाच खाऊन टाकेल.

Samyam (Restraint) – Inspirational story of Gautama Buddha’s philosophy

हे ही वाचा =====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका