विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल हाती आला. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 2 शिवसेनेचे (Shivsena) 2 आणि काँग्रेसचा (congress) 1 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची रणनीती राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील यशस्वी ठरली आहे. (MLC Election 2022 News In Marathi)
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल पार पडला असून महाविकासआघाडीचे पाच तर भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, भाजपचे राम शिंदे, भाजपचे प्रविण दरेकर, शिवसेनेचे आमशा पाडवी, भाजपचे उमा खापरे, भाजपचे श्रीकांत भारतीय, शिवसेनेचे सचिन अहिर, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत. (MLC Election 2022 Result)
भाजपाचे सगळे नेते विजयाचा आनंद साजरा करत आहेत. किंगमेकर फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेते विजयी जल्लोष साजरा करत आहेत. भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल १३३ मत पडले आहेत. राष्ट्रवादीला एकून ५७ मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीला एकून ६ अपक्षांची मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्याही पहिल्या पसंतीची ३ मतं फुटली आहेत. दरम्यान भाजपला अधिकची २७ मतं मिळाली आहेत.
दरम्यान, पहिल्या फेरीच्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे, प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. तसेच काँग्रसेचे भाई जगताप विजयी झाले आहे. मात्र, पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडुकीत पराभव झाला आहे.
हे ही वाचा ——-
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Informationदरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजारा केला जातो 1947 मध्ये ब्रिटीश राजवटीचा अंत, त्याच वर्षी 18 जुलैच्या भारतीय…
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathiशाहू महाराज, ज्यांना राजर्षी शाहू म्हणूनही ओळखले जाते, ते एक मराठा शासक होते ज्यांनी 19 व्या शतकाच्या आणि 20 व्या…
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?शिवरायांचा राज्याभिषेक हि घटना इतिहासातील सर्वांत महत्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते, या घटनेचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि याचे परिणाम सुद्धा…
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढूतुळापूर आणि वढू! पुणे जिल्ह्यातील भीमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या ऐतिहासिक तुळापूर या ठिकाणी छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांची हत्या…
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झालाTomb of Maharani Yesubai discovered; An old land donation letter led to the revelation छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी…