गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेकडून औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची मागणी केली जात होती. अखेर दोन्ही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आले आहे. या निर्णयाला काँग्रेसचा विरोध होता. असे असतानाही हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकारला धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० पेक्षा जास्त आमदार असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता वाढली आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. (aurangabad rename sambhajinagar thackeray government decision)
या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात आले आहे. तसेच नवी मुंबईच्या विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. आधी नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार होते. पण आता त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महत्वाचे निर्णय घेतले आहे. गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. आता याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहिती मंगळवारीच परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्यानंतर अखेर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहे. तुम्ही मला साथ दिली त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार. माझ्याच पक्षातील लोकांनी मला दगा दिला, पण तुम्ही मात्र आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे आभार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच पुढील निर्णय पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊ, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-—
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Information
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathi
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झाला