महात्मा गांधीजींची हत्या आणि वास्तव.

महात्मा गांधीजींची हत्या आणि वास्तव.

गांधीजींनी 55 कोटी पाकिस्तानला दिले, देशाची फाळणी केली म्हणून त्यांची हत्या केली असे सांगितले जाते. परंतु वस्तुस्थिती जाणून घेतली तर हा केवळ दिशाभूल करण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. गांधीजी हे बहुजन समाजातील होते. त्यांचे महत्त्व वर्ण अहंकारी लोकांना सहन होत नव्हते. The assassination (Murder) of Mahatma Gandhi and reality.

पहिला प्रयत्न 25 जून 1934 रोजी पुणे या ठिकाणी केला. 1934 साली गांधीजी अस्पृश्यता निवारणासाठी देशभर दौरा करत होते. 1934 साली स्वातंत्र्यही दृष्टीपथात नव्हते, पाकिस्तान आणि फाळणी हे विचार आसमंतात ही नव्हते. मग प्रयत्न का केला? 25 जून 1934 रोजी गांधीजी पुण्याला आले असताना पुणे मुन्सीपालटीने त्यांना मानपत्र द्यायचे ठरवीले. गांधीजी समारंभस्थळी पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी स्काऊट बँड वाजू लागला. अशावेळी त्यांच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला. देशाच्या सुदैवाने तो बॉम्ब बाजूच्या गाडी लगत पडला आणि त्या गाडीमध्ये असणारेआण्णा भोपटकर जखमी झाले. आशाही परिस्थितीमध्ये गांधीजींनी सभा न डगमगता पार पाडली. (श्रीपाद जोशी यांच्या महात्मा, माय बापू पुस्तकात प्रत्यक्षदर्शी म्हणून म्हणणे नोंदविले आहे. दुसऱ्या दिवशी प्रकाशित झालेल्या सकाळ वृत्त पत्रात सविस्तर नोंद आहे. जीडी तेंडुलकर लिखित महात्मा गांधी खंड 3 मध्ये विस्तृत वर्णन.) The assassination of Mahatma Gandhi and reality.

दुसरा प्रयत्न 22 जुलै 1944 रोजी पाचगणी या ठिकाणी गांधीजी विश्रांतीसाठी आले असताना, सायंकाळी प्रार्थनेच्या वेळेस नथुराम गोडसे सुरा घेऊन गांधीजीकडे धावला त्यावेळी प्रसंगावधान राखून शरीराने सुदृढ असणारे भिलारे गुरुजी व पुण्यातील सुरती हॉटेलचे मालक यांनी नथुराम गोडसेला सुरा सकट जागेवरच पकडले. गांधीजींनी दया दाखवून नथुरामला सोडून देण्यास सांगितले. चर्चा करण्याचे आवाहन केले परंतु कुठलेही कट्टरपंथी लोकांना चर्चेचा वावडंच असतं. (पुना हेराॅल्ड, टाइम्स ऑफ इंडिया मधे घटनेचा दुसऱ्या दिवशी उल्लेख.) The assassination (Murder) of Mahatma Gandhi and reality.

तिसरा प्रयत्न 9 सप्टेंबर 1944 रोजी गांधीजी सेवाग्रामहून मुंबईला बॅरिस्टर जीना यांना भेटण्यासाठी निघाले, अखंड हिंदुस्थान गांधीजींना ठेवायचा होता त्यासाठी जिना यांचे मन वळविण्यासाठी गांधीजी प्रयत्न करत होते. गांधीजी आणि जिनाची भेट होऊ नये तत्पूर्वीच गांधीजींचा खून करण्यासाठी सायंकाळच्या वेळेस हातात जंबीया घेऊन नथुराम गांधीजीकडे धावला परंतु प्रसंगावधान राखून आश्रम वासियांनी नथुरामला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. सेवाग्राम च्या ह्या घटनेची नोंद वर्धा पोलीस स्टेशन मध्ये आहे. यावेळी 55 कोटी फाळणी हे विषय अस्तित्वात नव्हते. The assassination (Murder) of Mahatma Gandhi and reality.

चौथा प्रयत्न 29 जून 1946 रोजी गांधीजी स्पेशल ट्रेनने मुंबईहून पुण्याला जात असताना नेरळ आणि कर्जतच्या दरम्यान रुळावर मोठ मोठे दगड टाकून अपघात घडविण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून गाडीच्या ड्रायव्हर परेरा यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबून भीषण अपघात टाळला परंतु गाडीचे इंजिन पूर्णपणे निकामी झाले. आणि गांधीजी होणाऱ्या अपघातातून थोडक्यात बचावले. The assassination (Murder) of Mahatma Gandhi and reality.

पाचवा प्रयत्न 20 जानेवारी 1948 रोजी गांधीजी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये सायंकाळी प्रार्थनेला जात असताना, त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला, गांधीजींच्या जवळच बॉम्ब पडला, प्रचंड स्फोट आणि धूर झाला, बॉम्ब फेकणारा मदनलाल पहावा याला पकडण्यात आले. मदनलाल पाहवा याने कबुलीजबाबात नथुराम गोडसे, नारायण आपटे हे प्रमुख सूत्रधार असून विष्णू करकरे किस्तया आणि बडगे सहभागी असल्याचे सांगितले. अशाही अवस्थेत गांधीजींनी न चुकता सायंकाळची प्रार्थना पूर्ण केली. केवढे हे धैर्य. The assassination (Murder) of Mahatma Gandhi and reality.

सहावा प्रयत्न आणि शेवटचा. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजी भल्या पहाटे उठले आणि काँग्रेस पक्षाच्या नवीन घटनेच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवून घटनेचे काम पूर्ण केले. संध्याकाळी प्रार्थना पूर्वी सरदार वल्लभाई पटेल आणि त्यांची मुलगी मनिबेन यांच्याबरोबर गांधीजी देशाच्या संबंधित चर्चा करीत होते. सरदार वल्लभाई पटेल हे गांधीजींचे शिष्य असल्यामुळे चर्चा सकारात्मक चालली होती. पंडित जवारलाल नेहरू बरोबर सहकार्य करून देश पुढे घेऊन जावा यासाठी गांधीजी मार्गदर्शन करत होते. गांधीजी प्रार्थनेची वेळ पाच वाजता असे. परंतु पाच वाजून दहा मिनिटे झाली म्हणून मनुने (नात) जेवण आणि गजरचे घड्याळ गांधीजी समोर ठेवले. पाच वाजून 15 मिनिटांनी गांधीजी प्रार्थनास्थळाकडे निघाले. आणि सरदार सरदार वल्लभाई पटेल मुलीसह बिर्ला हाऊसमधून बाहेर पडले. The assassination (Murder) of Mahatma Gandhi and reality.

आभा आणि मनू यांचा आधार घेत गांधीजी प्रार्थनास्थळाकडे निघाले. लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार करत गांधीजी प्रार्थना स्थळाकडे जात होते. तेवढ्यात करड्या, निळ्या रंगाचा मोठे खिसे असलेला शर्ट घातलेला तरुण माणूस गांधीजी समोर उभा राहिला. प्रार्थनेला उशीर होत आहे, म्हणून बंधू बाजूला व्हा म्हणून विनंती मनू गांधीनी केली. त्या तरुणाने मनूला (गांधीजींची नात) धक्कामारून बाजूला केले, त्याबरोबर मनुच्या हातातील जपमाळ आणि पिकदाणी खाली पडली. लोकांना काही कळायच्या आत खिशात हात घालून पिस्तूल बाहेर काढले आणि गांधींच्या छातीवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या. पहिल्या दोन गोळ्या आरपार गेल्या परंतु तिसरी गोळी छातीत अडकल्याने गांधीजी ‘हे राम’ म्हणून खाली पडले. हल्लेखोराला तेथील रघु नावाच्या माळ्याने पकडले आणि इतरांच्या सहकार्याने एका खोलीत बंदिस्त केले. हल्लेखोराला पाहण्यासाठी पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते न. वि उर्फ अण्णासाहेब गाडगीळ गेले असता त्यांनी हा तर पुण्यातील नथ्या म्हणून ओळखले. (नथुरामला पुण्यात नथ्या या नावाने ओळखत) The assassination (Murder) of Mahatma Gandhi and reality.

गांधी हत्येची बातमी काही वेळातच जगभर पसरली आणि सर्व जग दुःख सागरत बुडाले. स्वातंत्र्य संग्रामात भाग न घेता इंग्रजांना मदत करणाऱ्या आरोपींना उच्च न्यायालयात खटला चालवून खालील प्रमाणे शिक्षा प्रमाणित केल्या 1) नथुराम विनायक गोडसे (फाशी पंजाब मधील अंबाला जेल) 2) नारायण आपटे (फाशी पंजाब मधील अंबाला जेल) 3) विष्णू करकरे आजन्म कारावास 4) गोपाळ विनायक गोडसे आजन्म कारावास 5) मदनलाल पाहवा आजन्म कारावास 6) दत्तात्रय परचुरे आजन्म कारावास 7) विनायक दामोदर सावरकर पुराव्या अभावी निर्दोष. परंतु पुढे नेमलेल्या कपूर आयोगाने त्यांना दोषी ठरवले. (संदर्भ पुस्तके 1 लेटेस् किल गांधी, तुषार गांधी 2 धैर्यशील योद्धा गांधी, संकेत मुनोत आणि मेधा सुतार.) एक सुंदर जीव येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत जाऊन बसला. महानतेसाठी हत्या हा संकेत असावा. वरील इतिहासावरून आपण काय बोध घेणार, पुष्कळसे लोक पंचावन्न कोटी दिले, गांधीजींनी फाळणी केली म्हणून त्यांची हत्या केली हा समज घेऊन स्वर्गवासी झाले आणि काही पैगंबरवासी झाले. आपणही त्याच मार्गाने जायचे का? इतिहासाची पुनरावृत्ती होते. गांधीजींची हत्या ही फाळणी किंवा पंचावन्न कोटी यासंदर्भात न होता, गांधीजी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे चालले होते हे वर्ण अहंकारी लोकांना सहन न झाल्यामुळे गांधीजींची हत्या झाली असा इतिहास वरील घटना क्रमानुसार साक्ष देतो. जे इतिहास जाणून पेटून उठतात, त्यांना खऱ्या अर्थाने इतिहास समजलेला असतो. सद्यपरिस्थितीत फुटीरवादी लोकांपासून देशाला धोका आहे. इतिहासापासून धडा घेऊन देश अखंड ठेवणे, हीच गांधीजींना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. The assassination (Murder) of Mahatma Gandhi and reality.

Truth is God. – M. Gandhi.

श्री भानुदास सात्रस सर. शिरुर.9922820544

(महात्मा गांधी विचारांचे अभ्यासक)

================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका